सावत्र मुलीचं अपहरण अन् तिच्याबरोबरच थाटला संसार; हादरवून टाकणाऱ्या घटनेचा शोध दिल्ली पोलिसांनी चार वर्षांनी कसा घेतला?

सावत्र मुलीचं अपहरण अन् तिच्याबरोबरच थाटला संसार; हादरवून टाकणाऱ्या घटनेचा शोध दिल्ली पोलिसांनी चार वर्षांनी कसा घेतला?-mycivilexam.com
सावत्र मुलीचं अपहरण अन् तिच्याबरोबरच थाटला संसार; हादरवून टाकणाऱ्या घटनेचा शोध दिल्ली पोलिसांनी चार वर्षांनी कसा घेतला?

एका ४० वर्षीय महिलेने ज्या तरुणावर विश्वास ठेवून त्याच्याशी लग्न केलं, त्याच तरुणाने या महिलेच्या मोठ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं अन् जवळपास चार वर्षे जगापासून लपवून ठेवलं. पोलिसांनी या घटनेचा छडा कसा लावला याचा घटनाक्रम वाचा.

 एखाद्या महिलेची एक छोटीशी चूक तिला आयुष्यभराच्या संकटात टाकू असते असा एक धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. तिने निवडलेल्या जोडीदारामुळे तिच्यासह तिच्या मोठ्या मुलीचंही आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तब्बल चार वर्षे ही संबंधित महिला या दुस्वप्नाशी सामना करतेय. आता याप्रकरणाचा संपूर्ण तपास समोर आलाय. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

एका बिझनेस ट्रीपवर एका ४० वर्षीय महिलेची ३१ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. ही महिला घटस्फोटित होती. तिला १५ आणि १७ वर्षांच्या दोन मुली आहेत. या दोघांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात चांगली ओळख निर्माण झाली. फोन नंबर एक्स्चेंज करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यात संभाषण वाढत गेलं. यातून त्यांच्यात प्रेम निर्माण झालं अन् दोघांनीही संसार खुलवण्याचा निर्णय घेतला. महिला श्रीनगरस्थित होती, तर तरुण दिल्लीचा राहणारा होता. तरुणाने तिच्या घरच्यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम आखला अन् दोघांनीही एकमेकांबरोबर साताजन्माच्या गाठी बांधल्या. पण याच गाठी त्या महिलेच्या आयुष्यातील सर्वांत कठोर अन् खडतर गाठी ठरल्या. चार वर्षांनंतरही या महिलेच्या मनावरील जखमा कमी झालेल्या नाहीत. २०२० मध्ये लग्न झाल्यानंतर ही महिला तरुणाबरोबर दिल्लीत आपल्या दोन मुलींसह शिफ्ट झाली.

इथून सुरू झालं दुस्वप्न

जून २०२१ मध्ये या महिलेला काही कामानिमित्त तिच्या मूळ गावी श्रीनगर येथे जायचे होते. महिलेने या तरुणाला तिच्यासोबत येण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. घरात मुलींना सांभाळायला राहतो, असं सांगून त्याने तिला एकटीला श्रीनगरला पाठवलं. तिने अत्यंत विश्वासाने तिच्या दोन्ही मुलींची जबाबदारी त्याच्यावर सोपविली आणि ती निश्चिंतपणे श्रीनगरला गेली. पण तिचा विश्वासघात व्हायला फार वेळ लागला नाही. ती श्रीनगरहून परत येताच तिच्यासमोर धक्कादायक बाबी उघड झाल्या. तिची मोठी मुलगी अत्यंत अस्वस्थ दिसत होती. महिलेने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने उत्तर दिलं नाही. अखेर न राहावून या मोठ्या मुलीने तिच्या वडिलांना म्हणजेच महिलेच्या पहिल्या नवऱ्याला फोन लावला आणि सर्व हकिकत सांगितली. या नवऱ्याने महिलेला फोन करून सर्व गोष्टींचा जाब विचारला. महिलेने ज्या तरुणावर विश्वास ठेवला होता, त्याने तिचा विश्वासघात केला होता. कारण त्याने तिच्या मोठ्या मुलीचाच विनयभंग केला होता. याचा तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला.

दरम्यान, एवढं सगळं घडल्यावर महिलेने थेट पोलीस तक्रार केली. पोलीस तक्रार होताच हा तरुण वठणीवर आला अन् त्याने सर्वांची माफी मागितली. पण या महिलेने तरुणाला माफ केले नाही. तिने याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेदरम्यान महिलेने आपल्या मुलींना बवाना येथील त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला पाठवले होते. पण एवढं सगळं करूनही तिच्यासमोर वेगळंच ताट तयार होतं.

मुलगी बेपत्ता झाली अन् कथानकाला वेगळं वळण लागलं

बवाना येथून तिची मोठी मुलगी अचानक बेपत्ता झाली. या महिलेने २६ जून २०२१ रोजी मुलीच्या अपहराणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ती जवळपास चार वर्षे सापडलीच नाही. तिची प्रचंड शोधाशोध केली, सर्व शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या. पण ती सापडली नाही. पोलिसांनी मग या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तोही त्याच्या दिल्लीच्या राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. “आम्ही त्याचे कॉल डेटा रेकॉर्ड तपासले आणि बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि इतर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले, परंतु आरोपी किंवा महिलेच्या मुलीचा कोणताही पत्ता लागला नाही. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर एक वर्षानंतर आरोपीला गुन्हेगार घोषित करण्यात आले”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

अनेक छापे आणि इतर प्रयत्न करूनही, आरोपी आणि महिलेची मुलगी सापडली नाही. ते आता हयातच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण दोन वर्षांनंतर, नोव्हेंबर २०२४ मध्ये कोणीतरी दिल्ली पोलिसांना सांगितले की त्यांनी उत्तराखंड येथील डेहराडून येथे आरोपीला महिलेच्या मुलीसोबत पाहिले. त्यानुसार, सहाय्यक आयुक्त पवन कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि निरीक्षक विवेकानंद आणि एसआय शबनम सैफी यांचा समावेश असलेले दिल्ली पोलिसांचे पथक डेहराडूनला रवाना झाले. पण ते आरोपीला शोधण्यात अपयशी ठरले. “हा संबंधित तरूण त्याच्या मूळ नावाने राहत नसल्याचं देहरादून येथे कळलं. त्यामुळे त्याने नवं नाव धारण केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

पोलिसांची हीच शक्यता नंतर खरी ठरली. “आम्हाला नंतर कळले की आरोपीने कोणाची तरी ओळख चोरली होती आणि डेहराडूनमध्ये फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी त्याने त्या आयडीचा वापर केला होता”, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. “त्याला खूप विश्वास होता की त्याने त्याचे ट्रॅक चांगले कव्हर केले आहेत. इतकं की तो स्थानिक पोलीस स्टेशनमधून भाडेकरू पडताळणी करून घेण्याचा विचार करत होता. परंतु, त्याने एक छोटीशी चूक केली”, असंही पोलिसांनी सांगितलं.

आरोपीच्या नातेवाईकाचे बँक रेकॉर्ड स्कॅन करत असताना, पोलिसांनी UPI ॲपद्वारे अज्ञात व्यक्तीने केलेल्या मनी ट्रान्सफरचा तपास केला. यामुळेच त्याचा पर्दाफाश होऊ शकला. त्याने त्याच्या बदलेलल्या ओळखीच्या आधारे त्याच्या आईला पैसे पाठवले होते. यावरूनच त्याचा शोध घेण्यास पोलिसांना सोपं गेलं. “तो ज्या व्यक्तीच्या नावे राहत होता त्याचा तपशील आम्ही शोधून काढला. पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरी भेट दिली. अज्ञात व्यक्तीकडे आरोपीसारखं काहीच नव्हतं, असं चौकशीतून समोर आलं. या अज्ञात व्यक्तीने आरोपीला पाहिलेही नव्हते”, असं पोलीस म्हणाले.

असा लावला छडा

ज्या दिवशी ही मुलगी बेपत्ता झाली होती, त्या दिवशीच्या बसचीही चौकशी करण्यात आली. मुलीचं तिकिट आणि तिच्याबरोबर असलेल्या व्यक्तीच्या तिकिटावरील नाव तपासण्यात आले. तेव्हापासूनच हा व्यक्ती बनावट ओळख वापरत असल्याचं समोर आलं. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरू केल्यानंतर जवळपास चार वर्षांनी ती मुलगी डेहराडून येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये ती सापडली. पोलीस अधिकारी सांगतात, “त्या महिलेची मुलगी आता २० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, ती त्या माणसाच्या बाळापासून आठ महिन्यांची गर्भवती होती. अपहरणाच्या वेळी महिलेची मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाच्या तक्रारीत संबंधित कलमे जोडली. त्या माणसाच्या अटकेच्या एका महिन्यानंतर तिने मुलाला जन्म दिला.

मुलीने आईच्या नवऱ्याला मानलं पती

धक्कादायक बाब म्हणजे या चार वर्षाच्या काळात या मुलीने त्या तरुणाला आपला पती मानला आहे. अन् तिला आता त्याच्यासोबतच राहायचं आहे. त्या तरुणाचं आपल्या आईशी लग्न झालंय, हे माहीत असूनही ती तिच्या मतावर ठाम आहे. तिने समुपदेशनालाही नकार दिलाय. ती सध्या तिच्या आईसोबत न राहता दक्षिण दिल्लीतील एका गावात त्याच्या कुटुंबाबरोबर राहते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीचा घटस्फोट झालाच नाही

दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेने आरोपीशी लग्न केलं होतं, तेव्हा त्याने त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोटही घेतला नव्हता. ६ डिसेंबर २०२४ रोजी महिलेने श्रीनगरमध्ये पोलिसात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला जम्मू -काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आता तो काश्मीरमधील तुरुंगात अटकेत आहे. “आरोपी फरार असताना आपली ओळख लपवण्यासाठी वापरलेल्या सर्व कागदपत्रांची आम्ही छाननी करत आहोत. त्याच्या आई-वडिलांची भूमिकाही तपासात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमची टीम सध्या काश्मीरमध्ये आहे”, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय सैन यांनी सांगितले.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.