ऑस्ट्रेलियाने या कसोटी विजयासह पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने खिशात घातली. यासह ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली आहे.
सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या कसोटी विजयासह पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने खिशात घातली. यासह ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्याचबरोबर तब्बल दहा वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. या सामन्यात भारतीय संघाने १६२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. ज्यामुळे टीम इंडियाला चार धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव १५७ धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड (३४) आणि वेबस्टर (३९) यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताच्या या पराभवाने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ च्या शर्यतीतूनही बाहेर झाली.