छावा चित्रपटाचे लेखक आणि निर्माते यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केली आहे.
‘छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत. नागपूरमधील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी’, अशी मागणी मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. छावा चित्रपटात मुघल शासक औरंगजेब यांचे ज्याप्रकारे चित्रण केले, त्यामुळे तरूणांची माथी भडकवली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मौलाना रझवी यांनी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमजानमध्ये रोजा न ठेवल्याबद्दल टीका केली होती. तसेच शमीच्या मुलीने होळी खेळल्याबद्दलही बोल लावले होते.
