संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”

संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”

भाजपाचं अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलं. या अधिवेशनात अमित शाह यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेबाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान अमित शाह यांनी केला आहे असं राऊत म्हणाले आहेत.

अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?


महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.

उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान-राऊत


उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी दगाफटका केलेला नाही. तर भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रातल्या नेत्यांवर सडक्या शब्दांत टीका करतात-राऊत


संजय राऊत पुढे म्हणाले, शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली. शरद पवार यांनी पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत टीका करणं हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलं आहे का? आवडलं आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. कुणीतरी बाहेरचे लोक येतात, पदावर असणारे नेते असतील. पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

परळीत ज्यांना मोक्का लावला ती पोरंटोरं-संजय राऊत


परळीत जे काही घडलं आहे त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे सुरुच राहिल. काही पोराटोरांना त्यांनी मोक्का लावला आहे. ज्यांना मोक्का लावला आहे ते भाडोत्री आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहेत. त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकला आहे, त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला इथली परिस्थिती माहीत नाही का? गुंडांच्या मदतीने सरकार चालवणं ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

इंडिया आघाडी बळकट झालं पाहिजे-राऊत


शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच सहकाऱ्यांना हे वाटतं आहे की इंडिया आघाडी आणखी बळकट झाली पाहिजे. देशासमोर जे संकट आणि समस्या आहे ती म्हणजे मोदी आणि शाह. संविधानावर हल्ले होत आहेत. हे संकट असताना इंडिया आघाडीने बळकटीने एक राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.